शैक्षणिक वर्ष 2022 मधील दहावी-बारावीची लेखी परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घेतली जाणार आहे. राज्य शिक्षण मंडळाकडून परीक्षा घेण्यासाठी तयारी केली जात असून लवकरच याविषयी धोरणात्मक निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नियोजन सुरू करण्यात येत आहे. लवकरच लेखी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर होणार आहे.
मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य शिक्षण मंडळाने 10 वी आणि 12वीच्या लेखी परीक्षा रद्द केल्या होत्या. विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुण देऊन निकाल जाहीर करण्यात आला होता. मात्र, आता राज्यात कोरोनाचा उद्रेक कमी झाला आहे.
त्यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा या ऑफलाइन पद्धतीने घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी मंडळाने नऊ विभागीय मंडळांतून तयारीची माहितीही गोळा करण्यास सुरुवात केली आहे.
आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट
आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group