कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाला आहे आणि त्यामुळे निर्बंधही कमी झाले आहेत. निर्बंध कमी झाल्याने नागरिक आता मोठ्या उत्साहात होळी व धुळवड साजरी करण्याचा बेत आखत आहेत. पण थांबा थांबा. कारण, होळी आणि धुळवड साजरी करण्याच्या संदर्भात राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. राज्याच्या गृह खात्याकडून ही नियमावली जाहीर करण्यात आली असून त्या संदर्भातील नियमांचे पालन नागरिकांना करावेच लागणार आहेत.



या नियमावलीनुसार, रात्री 10 वाजल्यानंतर होळी साजरी करता येणार नाहीये. तसेच डीजे लावण्यासही बंदी घालण्यात आली आहे.



सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत आणि त्यामुळेच डीजे न लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. होळी आणि धुळवड साजरी करत असताना मद्यपान करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे. रंगपंचमी किंवा धुळवड साजरी करत असताना अनेक ठिकाणी रंगांच्या पाण्याने भरलेले फुगे तसेच पिशव्या मारल्या जातात. मात्र, कुठल्याही जाती किंवा धर्माच्या भावना दुखावल्या जातील अशा घोषणा देऊ नये.



यंदाच्या वर्षी होळी 17 मार्च रोजी आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 18 मार्च रोजी धूलिवंदन आहे. तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पाच दिवसांनी धुळवड साजरी करण्यात येत असते.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version