अलिबाग, जि.रायगड, दि.22/10/2020:
ऑक्टोबर 2020 मध्ये रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. पिकांच्या नुकसानीबाबतचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित शासकीय यंत्रणेला देण्यात आले आहेत.
अदयापही शासकीय यंत्रणा पंचनामा करण्यासाठी आपल्यापर्यंत पोहोचली नसेल, तर संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी खालील गुगल लिंकवर नुकसानीचा अर्ज भरावा.
https://docs.google.com/…/1W944r3a8eXfK_H8V8zEiOhl7vLD…/edit
तसेच ज्यांचे नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत, त्यांनीच हा अर्ज भरावा, याचीही काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सर्व शेतकरी बांधवांना केले आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त मात्र पंचनामे न झालेल्या शेतकऱ्यांनी गुगल लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज भरावेत @CMOMaharashtra@iAditiTatkare @MahaDGIPR@InfoDivKonkan @RaigadPolice
— DISTRICT INFORMATION OFFICE, RAIGAD (@InfoRaigad) October 22, 2020
सविस्तर वृत्तhttps://t.co/DfCHrj4ezA pic.twitter.com/EX9zlFCBFq