Ambet bridge open

आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट



रायगड आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यांना जोडणारा सावित्री नदीवरील महत्वाचा आंबेत पूल आज अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. गेले वर्षभर दुरुस्तीच्या कामासाठी या पुलावरील वाहतूक पूर्ण बंद ठेवण्यात आली होती.



हा पूल बंद असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली आणि खेड तालुक्यातील प्रवासी, पर्यटक व नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तब्बल अकरा कोटी रुपये खर्च करुन हा धोकादायक पूल दुरूस्त करुन पुन्हा एकदा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.



रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आज (27 जून 2021) नुतनीकरण झालेल्या पुलाचे लोकार्पण केले. आगामी काळात या ठिकाणी नवीन पूल उभारण्याचा मानस असून तसा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्याचे आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले.



आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

Raigad Explore Ads with us
error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.