विनामास्क फिरणाऱ्यांवर करण्यात येणारी दंडात्मक कारवाई बंद करून दंड आकारला जाऊ नये असे पोलीस अधीक्षक- रायगड यांच्या कार्यालयाकडून दि. ७ मार्च २०२२ रोजी पाठवण्यात आलेले पत्र समाजमाध्यमांवर पसरत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.
परंतु विनामास्क फिरणाऱ्यांवर करण्यात येणारी दंडात्मक कारवाई बंद करण्याबाबाबत कोणतेही निर्देश शासनामार्फत आलेले नसून दंड आकारण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी सांगितले आहे.
विनामास्क फिरणाऱ्यांवर करण्यात येणारी दंडात्मक कारवाई बंद करून दंड आकारला जाऊ नये असे पोलीस अधीक्षक- रायगड यांच्या कार्यालयाकडून दि. ७ मार्च २०२२ रोजी पाठवण्यात आलेले पत्र अप्पर पोलीस अधीक्षक- रायगड यांच्या कार्यालयाकडून दि. ११ मार्च २०२२ रोजीच्या पत्रकाद्वारे मागे घेण्यात आले आहे.
कोविड-१९ संदर्भातील शासनाने दिलेल्या अटी व शर्थीचे पालन करून नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी केले आहे. रायगड पोलिसांनी काढलेल्या आधीच्या आदेशाने जिल्ह्यात मास्क न लावणाऱ्यांची संख्या वाढू लागली त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची भीती निर्माण झाली होती त्यामुळे आदेश मागे घेऊन पुन्हा मास्क न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार आहे.
आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group